केळझर येथे ट्रॅक्टर रॅलीचे शेतकऱ्यांकडून जंगी स्वागत

सेलू शेतकन्यांचा सातबारा कोरा करा, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आर्वी येथून नागपूरकडे निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीचे केळझर येथे आगमन होताच बायपासवर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी ‘जय जवान, जय किसान’चे नारे देत घोषणा दिल्या. सुकळी येथील मुक्कामानंतर मंगळवारी ट्रॅक्टर रैली येळाळी पिपरी, वर्धा, पवनारमार्गे सेलवरुन दुपारी बायपासवर दाखल होताच बैंडबाजासह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

केळझरचे माजी उपसरपंच फारुख शेख व मित्र परिवार दहेगाव गोसावीचे माजी सरपंच संदिप वाणी माजी सरपंच तुळजापुर प्रमोद उमगिरे शिवसेनेचे किशोर जाधव अमीत तेलंग मिलींद गव्हाळे, गणेश धरमुळ, सुधाकर मेश्राम, प्रविण नखाते, सुनील नखाते सुदाम पवमवे, महेश तेलरांधे, राजेंद्र लाखे दर्शन नखाते शंकर करनाके अंकित ठोंबरे दिवाकर अवचट, पुरुषोत्तम तेलरांधे केळझर, वडगाव जुनगड, दहेगाव जंगली गोसावी, आमगाव, खडकि सेलडोह यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट बॉक्स उद्धवसेना प्रहार अपंग क्रांती संघटना, प्रहार संघटना, किसान अधिकार अभियानाच्या कार्यकत्यांसह विविध गावांतील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

नंतर ही रॅली खडकी, सेलडोह मार्गे बुटीबोरी नागपूरकडे रवाना झाली. केळझर येथे फारुख शेख मित्रपरिवार व परिसरातील शेकडो शेतकर्यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह सोबत असलेल्या ट्रॅक्टर रॅलीचे बायपासवर जंगी स्वागत केले. जेसीपिने वरून फुलांचा वर्षाव करण्यात आला. ब्यांडवाजासह 1. फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली. तर हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर रॅलीतील शेतकर्यांना चहा व पाणी बाटलची व्यवस्था करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *