सार्वजनिक आयुष्यात काम करीत असताना विरोधात असलेल्या व्यक्तीचा देखील सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे. मतभेद हे वैचारिक असले तरी त्यामुळे परस्परांचा अनादर होईल अशी विधाने होऊ नयेत हे तत्व अगदी काही वर्षापर्यंत काळापर्यंत पाळले जात होते. पण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही विकृतांना मोकळे रान देऊन आपले राजकीय हेतू साध्य करण्याचा अनिष्ट पायंडा विद्यमान राज्यकर्ते मंडळींनी पाडला ही अतिशय खेदजनक बाब आहे .
स्व. राजारामबापू पाटील हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले विकासाभिमुख नेतृत्व होते. त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर जयंतराव पाटील यांनी त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालविला आहे. या अशा समर्पित कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह विधाने करणान्या नादान व्यक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत असतील तर ते राज्याची सार्वजनिक संस्कृती पायदळी तुडविण्याचे काम करीत आहेत असे म्हणावे लागेल. अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांनी मत व्यक्त करीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष विनोद बानखेडे,शहराध्यक्ष बाळू वानखेडे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगरसेवक मोहम्मद रफीक, समाजसेवक सुनिल डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोते, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, जिल्हा सचिव मिलिंद कोपुलकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, अल्पसंख्याक सेलेचे पाशु मिश्रा, मो.अली अजानी, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोगणकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, कृषी जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, युवक तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे,
सुनील भुते, नितीन भुते, हेमंत घोडे, संजय गांभुळे, परम बावणे, सुनिल घोडखांदे, किशोर चांभारे, नदीमभाई, महिला शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, मीना सोनटक्के, दिपाली रंगारी, आचल वकील, समता वाणी, सुलभा मुन, साधना ढवळे, दुर्गा येसेकर, विनोद मिलमिले, अनिल लांबट, साहेबराव येडे, प्रशांत एकोणकर, बच्चु कलोडे, उमेश नेवारे, गजानन महाकाळकर, जितेंद्र रघाटाटे, बबळू शेख, कुणाल येसकर, प्रवीण भुते, विपुल थुल, राहुल जाधव, देवा शेंडे, अमित रंगारी, शेखर ठाकरे, रवी गिरसावले, नरेश चिरकुटे, सुभाष सोयाम, राहुल जाधव, छोटू वानखेडे, विपुल बाई, पंकज भट्ट, मोहम्मद शाहिद, हुकेश ढोकपाडे, दीपक चांगल, पंकज वांदिले, विजय हजारे, पप्पू आष्टीकर, मारोती राऊत, गोलू भुते, भारत बावणे, अमोल भिंबेकर, अभय सावरकर, निखिल शेळके, आकाश हुरळे, अभिजीत सावळे, यश झाडे आदी उपस्थित होते.