वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक संघटनात्मक आढावा व कार्यकारणी सह जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत राबवल्या कार्यक्रमाची माहिती व सूत्रसंचालन वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री मनोजभाऊ चांद्रक यांनी केले. आढावा बैठकीमध्ये सर्व ब्लॉक अध्यक्ष, शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांनी कार्यकारिणी व संघटनात्मक आढावा सादर करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत या प्रकारचे सुतोवाच केले.
बैठकीत जिल्हातील संगठन अधिक सक्षम आणि मजबूत दाखवा व येणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी व रणनीती सादर सरखेल वर्मा करण्यात आली. यावेळी मा. श्री. राजेंद्र मुळक यांनी कार्यकर्त्यांना एकजुटून स्थानिक पातळीवर जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले आणि काँग्रेस पक्ष हा समाजहितासाठी सदैव लढत राहील असा विश्वास व्यक्त केला. बूथ लेवलवर चर्चा करावी व नवीन वि. एल. ए. तयार करावे, मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असा सूचना मा. आमदार व मंत्री श्री. रणजीतदादा कांबळे यांनी बैठकीत दिले. बैठकीत जिल्हातून आलेले काँग्रेस पदाधिकारी विचार ठेवत अनेक महिला व पुरुषांनी पक्षात प्रवेश केला व काहीना पदनियुक्त करून पद देण्यात आले. यावेळी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून सर्व सेल अध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, महिला पुरुष यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.