प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा : प्रमोद चौरपगार ऑल इंडिया समता सैनिक दल आर्वी तालुका शाखेच्या वतीने १३ मार्च समता सैनिक दलाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
आर्वी मार्च पास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली ऑल इंडिया समता सैनिक दल आर्वी तालुका अध्यक्ष प्रमोद चौर पगार व शहराध्यक्ष अरविंद वाघमारे यांच्या नेतृत्वात मानवंदना देण्यात आली बुद्ध विहारामध्ये झालेल्या स्थापनादिन कार्यक्रमाला प्रा. पंकज वाघमारे, ओमप्रकाश मनोहर पाटील, पंकज भिमटे, सुजित भिवगडे, यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद चौरपगार यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त केले प्रास्ताविक प्रवीण ढोणे व आभार अरविंद वाघमारे यांनी मानले.
प्रमोद चौरपगार, अरविंद वाघमारे, प्रवीण ढोणे, अरुण गोपाळे, भिक्कू सातपुते, अंकुश वाघमारे, सुजल ढोणे, किरण कोल्हे, अमर मेहरे, प्रवीण काळे, राजकुमार देशभ्रतार समता सैनिक दलाच्या महिला युनिट रुखमा डुकरे, ललीता चहादे, बेबी वाघमारे, यशोधरा सौदागर, रिना चौरपगार, सुमन गायकवाड, पद्मा काळे, सुषमा अंभोरे, पद्मा सवाई, निळवंती बूटले, प्रणाली काळे, आशा काळे, सुजाता काळे, सुशिला काळबांडे, पल्लवी मेश्राम, रंजना मनवर.