राज्यमंत्री याच्या जनता दरबार मध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमांची पायमल्ली भ्रष्टाचाराच्या बाबत तक्रार

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथील शासन निर्णयाचे उल्लंघन होत असून वरिष्ठ अधिकारी यांचे कार्यालयावर नियंत्रण नसल्याने वेळोवेळी त्याबाबत सूचना त्यांना दिल्या परंतु त्यांचे लक्ष नसल्याने दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. डॉ. पंकज भोयर साहेब राज्यमंत्री गृह ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री वर्धा याच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार घेण्यात आला तेव्हा निवेदन सादर करत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नवीन इमारत सालोड (हिरापूर) येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून महसूल विभागानंतर सर्वात जास्त भ्रष्टाचार या RTO कार्यालयात होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *